Saturday, December 5, 2020

शिक्षण एक गेट पास कि काय ??

बालपणीचा काळ सुखाचा, मजा करा, खेळ आणि बागडा हे समीकरण असणाऱ्या काळात आपण वाढलो, साहजिकच शिक्षण हि काळाची गरज या बद्दल अजिबात हि दुमत नाही. परंतु काळाच्या ओघात हि गरज कधी व्यवसाय बनली हे कळलंच नाही.


आजकालच्या या स्पर्धेच्या युगात ज्याला आपण व्हुका  वर्ल्ड (VUCA World) असे म्हणतो, 

V = Volatility म्हणजे अस्थिरता 

U = Uncertainty म्हणजे अनिश्चितता 

C = Complexity म्हणजे गुंतागुंत 

A = Ambiguity म्हणजे अस्पष्टता 

यात खरंच प्रचंड अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत, अस्पष्टता आहे हे मात्र खरंच ..कोरोना च्या काळात आपण जी शिक्षण पद्धती अनुभवत आहोत त्या वरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता केवळ मार्कांमध्ये मोजणे  कितपत योग्य आहे याचा प्रश्न आता पडू लागला आहे. 


बौद्धिक क्षमते बरोबरच काही मूलभूत गुण हे असतील तर कदाचित आपण या व्हुका  वर्ल्ड  (VUCA World )  मध्ये टिकू शकतो.


कोणे एके काळी गुरुकुल पद्धत होती, नंतर काळाप्रमाणे बदलत आज घरकुल शिक्षण पद्धत ( online school )  आली. बदल हा नेहमी सकारात्मक पद्धतीने स्वीकारला पाहिजे. 

कदाचित याच हे एक उदाहरण असेल. आजच्या अँड्रॉइड मोबाईलच्या जमान्यात बटनाचे मोबाइलला किती लोक वापरतात??


परंतु कोरोना जर आला नसता तर आपण  online Education  एवढे सहज स्वीकारलं असत का ??


प्रत्येक गोष्टींमध्ये काही तरी सकारात्मक आहे असा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. आपल्या कडे काय नाही या साठी रडत बसण्यापेक्षा काय आहे आणि काय करता येईल या साठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे हि तितकेच महत्वाचे आहे.

 

तर सध्याच्या सो कॉल्ड व्हुका  वर्ल्ड (VUCA Corporate World) मध्ये टिकायचं असेल तर शिक्षणा बरोबर तुमचा सकारात्मक दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे. अमुक बोर्ड, तमुक कॉलेज या मध्ये मुलांना अडकवून ठेवण्या पेक्षा त्यांच्या असणाऱ्या उपजत गुणांना हेरून त्यांना प्रोत्सहन दिले तर आपणंच मुलांना यशस्वी बनवू शकतो.

 

कॉर्पोरेट जगतात काम करत असताना आपण जे शाळा / कॉलेज मध्ये शिकतो त्यातलं किती वापरतो?


शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे आहे परंतु त्या बरोबर मुलांची (Value System Development ) गरजेची आहे. 


गेले १६ वर्ष मानव संसाधन क्षेत्रात काम करत असताना आलेले अनेक अनुभव हे शिकवून जातात कि मार्क्स पेक्षा तुमचा  सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रामाणिक प्रयत्न याचा वाटा  तुमच्या शिक्षणाइतकाच महत्वाचा आहे. 


१५ वर्षापूर्वी नोकरी निमित्त पुण्यापासून ६०-६५ किमी रोज प्रवास करावा लागत होता, तो काळ माझ्या साठी शिकण्याचा काळ होता. पुरेशी बौद्धिक आणि आर्थिक परिस्थिती नसल्या मुळे पूर्ण वेळ शिक्षण घेणे शक्य नसल्यामुळे पार्ट टाईम MBA  केलं आणि  HR  मध्ये जाण्याचा मला गेट पास मिळाला!!


तिथेच आलेला अनुभव, माझ्या कंपनी मध्ये एक  ITI  Apprentice मुलगा होता, रोजचा ८०-८५ किमी प्रवास रेल्वेनी करून सकाळी ८.३० ला लोणावळा गाठायचा आणि त्या काळात त्याला असणारा पगार अतिशय कमी होता. परंतु काही गुण हे उपजत असतात.  Apprentice निमित्त त्याच्याशी नेहमी भेटी गाठी होत, परंतु कुठंही अंतराचे रडणं नाही कि, रेल्वे प्रवासाचा थकवा नाही. नेहमी हसतमुख आणि डोळ्यात नवीन काही करण्याची चमक.  Apprentice  पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाला माझ्या वरिष्ठानी HR  मध्ये काम देण्याबद्दल विचारले, आणि तो हि तयार झाला, सुरुवातीला कंत्राटी कामगारांची हजेरी, त्याचे कागदपत्र आणि इतर काम शिकून पठ्या पुढच्या तयारीला लागला. अतिशय अल्पावधीत त्याने अनेक गोष्टी शिकल्या, ग्रामीण भागातील असल्यामुळे भाषेची असणारी पकड घट्ट होती , त्याचाच वापर करत लोकांशी संबंध सुधारत त्याने पुढचं पाऊल टाकलं पदवी मिळवली आणि हो रोजचा ८०-८५ किमी प्रवास सुरूच होता.

एवढ्यावर न थांबता त्याने व्यवस्थांपन विषयात पदविका हि केली आणि मजल दर मजल करत स्वतःचा सर्वांगीण विकास हि केला. तात्पर्य हेच कोणतेही विशिष्ट शिक्षण नसताना केवळ सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य प्रयन्त याच्या जोरावर तुम्ही यशस्वी होऊ शकता हे नक्कीच..


कोणतेही शिक्षण डिग्री किंवा डिप्लोमा या पुरत मर्यादित असते. त्या सर्टिफिकेट मुळे तुम्हाला केवळ कॉर्पोरेट किंवा नोकरी साठी प्रवेश मिळतो, म्हणूनच कि काय शिक्षण एक गेट पास!!!


चला तर मग असेच काही वैचारिक बदल घडवूया...

 

राहुल विठ्ठलराव भोईटे.


14 comments:

  1. Nice dada kharch aahe be positive every moment

    ReplyDelete
  2. Very true sir, amazing strength in positive attitude!!

    Good one 👍👍

    ReplyDelete
  3. Very nice thought sir👍👍👍

    ReplyDelete
  4. अतिशय उत्कृष्ट लेख आहे. एखाद्या मात्तबर लेखकाला लाजवेल इतकी कामगिरी उल्लेखनीय आहे.

    ReplyDelete
  5. Nice Blog Rahul....positive attitude is must....

    ReplyDelete
  6. फारच सुंदर लेख आहे. अगदी माझ्या सुरुवातीच्या करिअरच्या काळाशी जुळतो आहे.

    ReplyDelete

वर्क लाईफ बॅलन्स काळाची गरज ?

जागतिक महासत्ता बनण्यासाठी जर चीनशी स्पर्धा करायची असेल तर कॉस्ट आणि क्वालिटी यावर करावी लागेल. आपली मानसिकता थोडी बदलावी लागेल. ते कितपत शक...