Monday, May 23, 2022

 डास आणि सकारात्मकता....


प्रसंग १ 

नमस्कार, गेले काही महिन्यांपासून सोसायटी परिसरात डासांचा प्रादुर्भाव खूप वाढला होता, स्वाभाविक सोसायटी मध्ये पेस्ट कंट्रोल करून काही कमी होईल असं वाटलं म्हणून तेही  केलं, परंतु हा प्रभाव फक्त काही दिवसच राहिला. सतत चर्चेचा विषय झाला तो म्हणजे डास, बघावं तिकडं डासच डास...

योग्य ती फवारणी करून ती तक्रार काही प्रमाणात सुटली... परंतु हि सोय सुद्धा तात्पुरतीच..


तात्पर्य - नुसता विचार करून काही होत नाही, तर त्याला कृतीची जोड लागते. पण त्या कृतीतुन अपेक्षित यश येईल याचा भरवसा नाही...



प्रसंग २ 

नेहमी गजबज असणाऱ्या एन डी ए रोड वरून येताना एका ठिकाणी अतिक्रमण कार्यवाही होताना दिसली, सगळ्या भाजी, फळांच्या टोपल्या उचलल्या जात होत्या, लोकांची धावपळ सुरु होती, मनात पहिला विचार आला, चला काही तरी सकारात्मक होतंय, अनधिकृत फेरीवाल्यांवर कार्यवाही होतेय, वाहतुकीला होणार त्रास कमी होईल, वेळेवर घरी जातायेईल, त्या  भाजीवाल्यांमुळे होणारी गर्दी कमी होईल, अपघातांची शक्यता कमी होईल, असे एक ना अनेक सकारात्मक विचार घेऊन मी गर्दीतून गाडी चालवत पुढे आलो. मुलगा बरोबर होता, त्याचा विचार होता, या बिचाऱ्यांचं नुकसान झालं,कोणाचं घर चालत असेल यावर, तर कोणी संध्याकाळच्या भाकरीची वाट बघत असेल....


तात्पर्य - नियम आणि शिस्तीपोटी कोणी खरा गरजवंत चिराडला जात नाही ना ?


प्रसंग ३ 

एक दिवस सुट्टीच्या दिवशी काही कामानिमित्त बाहेर जाण्या साठी गाडी काढली, सोसायटी गेट जवळ जाईपर्यंत, लक्षात आलं कि, डासांचा प्रश्न मिटलेला नाही, कारण दिसलं कि गाडीमध्ये २ डास आहेत, त्यांना बाहेर जाता यावे म्हणून खिडकीच्या काचा खाली घेतल्या, परंतु ते काही बाहेर जायचं नाव घेईनात. शेवटी कसे बसे बाहेर गेले, तोवर गाडी एन डी ए रोडवर आली होती, बाहेर पाहिलं तर सगळं रस्ता सामसूम, भाजीवाले नाहीत, फळवाले नाहीत, मधेच एका ठिकाणी एक लहान मुलगा पालेभाजीवर पाणी शिंपडताना दिसला, पण नजर कावरी बावरी, कधी गाडी येईल आणि सामान उचलून नेईल.. 


गणपती माथ्याच्या पुढे आलो आणि का कोणास ठाऊक पुन्हा गाडीत डास आहे का भास झाला, आपोआपच हात खिडकी उघडायला गेला, परंतु बाहेरून अतिक्रमण पथकाचा कर्मचारी जाताना दिसला.. आणि सगळे सकारत्मकतेचे विचार गळून पडले...


तात्पर्य - आजकालच्या या धकाधकीच्या काळात, कळत नकळत, आपण आपल्या सोयीसाठी किती तरी गोष्टी करत असतो, परंतु याचा इतरांच्या आयुष्यावर काही परिणाम होईल का याचा विचार आपण करत नाही.  

वर्क लाईफ बॅलन्स काळाची गरज ?

जागतिक महासत्ता बनण्यासाठी जर चीनशी स्पर्धा करायची असेल तर कॉस्ट आणि क्वालिटी यावर करावी लागेल. आपली मानसिकता थोडी बदलावी लागेल. ते कितपत शक...