बंद म्हणजे काय ???
सोमवार सकाळ म्हणजे ऑफिसचा पहिला दिवस... नेहमीच्या धावपळीत ऑफिसला पोचलो न पोचलो तोच सौं चा फोन आला... शाळेतून फोन आला आहे मुलांना घरी घेऊन जा.. दुपारी बस येणार नाही सोडायला !!!
पहिला विचार डोक्यात आला सकाळी बस च्या मावशी काकांना सोसायटी मध्ये सोडा म्हणून केलेल्या दादागिरी मुळे तर अस झालं नाही ना!!!
मी नेहमीच उत्तर देत, बघतो सांगून शाळेत विचारलं तर बातमी खरी आहे कळलं...आता काय तर बायकोला शाळेत जावं लागणार हे नक्की.
पण हे सगळं का सुरु आहे हे उत्तर काही सापडेना... आपल्या नेहमीच्या आपुलकीच्या मित्रा कडे (गुगल) कडे चौकशी केली असता ...काही बातम्या बंद संदर्भात दिसल्या....
कामाच्या गडबडीत गुंतून गेल्याने लक्षात आले नाही कि आज बंद आहे...
घरी आल्या वर बायकोने सांगितलेला प्रसंग ऐकून मनात थोडी कालवाकालव झाली.
ती मुलांना शाळेत घ्यायला गेली असता माझा ६ वर्षाचा मुलगा वाट बघत बसला होता...नजर कावरीबावरी आणि कोणच्या तरी शोधात...कारण कोणीच दिसत न्हवतं.. ना बस चे ड्राइवर ना बस च्या मावशी... मागून आईची हाक ऐकून स्वारी खुशीत आली... आणि म्हणाली "मला वाटलं आज शाळेतच दुपारच्या शिफ्टला पण बसावं लागेल कारण आज बसच नाही.." शेजारी मित्र अर्णव जोशी मस्त बसला होता... दोघांचं डबा खाण्याचं काम सुरु होत...
पण डब्यात कोबीची न आवडणारी भाजी असल्या मूळ स्वारी थोडी नाखूष होती...पण अर्णव डबा खात होता..
बायकोने विचारलं का रे डबा नाही खात... उत्तर आलं अर्णवला भूक लागली म्हणून त्याला दिला डबा...
मित्रानो एवढं सांगण्याचं कारण हेच... या बाल मनाला जिथे जात पात, धर्म कळत नाही त्यांना आपण बंद पाळून काय देतोय..
जातपात, आरक्षण, आत्महत्या, बंद या आणि अनेक गोष्टींचे पुढील पिढीवर होणारे परिणाम लक्षात घेऊन या मध्ये अडकून राहण्या पेक्षा त्यांना एक माणूस म्हणून जगायला शिकवलं पाहिजे...
एक गोष्ट नक्की एक चांगला माणूस म्हणून राहण्या साठी कोणालाच कोणताही आरक्षण लागणार नाही... आणि बंद हि करावे लागणार नाहीत...
म्हणूनच वाटत बंदच बंद करा !!!!!!
सोमवार सकाळ म्हणजे ऑफिसचा पहिला दिवस... नेहमीच्या धावपळीत ऑफिसला पोचलो न पोचलो तोच सौं चा फोन आला... शाळेतून फोन आला आहे मुलांना घरी घेऊन जा.. दुपारी बस येणार नाही सोडायला !!!
पहिला विचार डोक्यात आला सकाळी बस च्या मावशी काकांना सोसायटी मध्ये सोडा म्हणून केलेल्या दादागिरी मुळे तर अस झालं नाही ना!!!
मी नेहमीच उत्तर देत, बघतो सांगून शाळेत विचारलं तर बातमी खरी आहे कळलं...आता काय तर बायकोला शाळेत जावं लागणार हे नक्की.
पण हे सगळं का सुरु आहे हे उत्तर काही सापडेना... आपल्या नेहमीच्या आपुलकीच्या मित्रा कडे (गुगल) कडे चौकशी केली असता ...काही बातम्या बंद संदर्भात दिसल्या....
कामाच्या गडबडीत गुंतून गेल्याने लक्षात आले नाही कि आज बंद आहे...
घरी आल्या वर बायकोने सांगितलेला प्रसंग ऐकून मनात थोडी कालवाकालव झाली.
ती मुलांना शाळेत घ्यायला गेली असता माझा ६ वर्षाचा मुलगा वाट बघत बसला होता...नजर कावरीबावरी आणि कोणच्या तरी शोधात...कारण कोणीच दिसत न्हवतं.. ना बस चे ड्राइवर ना बस च्या मावशी... मागून आईची हाक ऐकून स्वारी खुशीत आली... आणि म्हणाली "मला वाटलं आज शाळेतच दुपारच्या शिफ्टला पण बसावं लागेल कारण आज बसच नाही.." शेजारी मित्र अर्णव जोशी मस्त बसला होता... दोघांचं डबा खाण्याचं काम सुरु होत...
पण डब्यात कोबीची न आवडणारी भाजी असल्या मूळ स्वारी थोडी नाखूष होती...पण अर्णव डबा खात होता..
बायकोने विचारलं का रे डबा नाही खात... उत्तर आलं अर्णवला भूक लागली म्हणून त्याला दिला डबा...
मित्रानो एवढं सांगण्याचं कारण हेच... या बाल मनाला जिथे जात पात, धर्म कळत नाही त्यांना आपण बंद पाळून काय देतोय..
जातपात, आरक्षण, आत्महत्या, बंद या आणि अनेक गोष्टींचे पुढील पिढीवर होणारे परिणाम लक्षात घेऊन या मध्ये अडकून राहण्या पेक्षा त्यांना एक माणूस म्हणून जगायला शिकवलं पाहिजे...
एक गोष्ट नक्की एक चांगला माणूस म्हणून राहण्या साठी कोणालाच कोणताही आरक्षण लागणार नाही... आणि बंद हि करावे लागणार नाहीत...
म्हणूनच वाटत बंदच बंद करा !!!!!!