Tuesday, May 5, 2020

बंद म्हणजे काय ???

बंद म्हणजे काय ???

सोमवार सकाळ म्हणजे ऑफिसचा पहिला दिवस... नेहमीच्या धावपळीत ऑफिसला पोचलो न पोचलो तोच सौं चा फोन आला... शाळेतून फोन आला आहे मुलांना घरी घेऊन जा.. दुपारी बस येणार नाही सोडायला !!!
पहिला विचार डोक्यात आला सकाळी बस च्या मावशी काकांना सोसायटी मध्ये सोडा म्हणून केलेल्या दादागिरी मुळे तर अस झालं नाही ना!!!

मी नेहमीच उत्तर देत, बघतो सांगून शाळेत विचारलं तर बातमी खरी आहे कळलं...आता काय तर बायकोला शाळेत जावं लागणार हे नक्की.

पण हे सगळं का सुरु आहे हे उत्तर काही सापडेना... आपल्या नेहमीच्या आपुलकीच्या मित्रा कडे (गुगल) कडे चौकशी केली असता ...काही बातम्या बंद संदर्भात दिसल्या....

कामाच्या गडबडीत गुंतून गेल्याने लक्षात आले नाही कि आज बंद आहे...

घरी आल्या वर बायकोने सांगितलेला प्रसंग ऐकून मनात थोडी कालवाकालव झाली.

ती मुलांना शाळेत घ्यायला गेली असता माझा ६ वर्षाचा मुलगा वाट बघत बसला होता...नजर कावरीबावरी आणि कोणच्या तरी शोधात...कारण कोणीच दिसत न्हवतं.. ना बस चे ड्राइवर ना बस च्या मावशी... मागून आईची हाक ऐकून स्वारी खुशीत आली... आणि म्हणाली "मला वाटलं आज शाळेतच दुपारच्या शिफ्टला पण बसावं लागेल कारण आज बसच नाही.." शेजारी मित्र अर्णव जोशी मस्त बसला होता... दोघांचं डबा खाण्याचं काम सुरु होत...

पण डब्यात कोबीची न आवडणारी भाजी असल्या मूळ स्वारी थोडी नाखूष होती...पण अर्णव डबा खात होता..
बायकोने विचारलं का रे डबा नाही खात... उत्तर आलं अर्णवला भूक लागली म्हणून त्याला दिला डबा...

मित्रानो एवढं सांगण्याचं कारण हेच... या बाल मनाला जिथे जात पात, धर्म कळत नाही त्यांना आपण बंद पाळून काय देतोय..

जातपात, आरक्षण, आत्महत्या, बंद या आणि अनेक गोष्टींचे पुढील पिढीवर होणारे परिणाम लक्षात घेऊन या मध्ये अडकून राहण्या पेक्षा त्यांना एक माणूस म्हणून जगायला शिकवलं पाहिजे...

एक गोष्ट नक्की एक चांगला माणूस म्हणून राहण्या साठी कोणालाच कोणताही आरक्षण लागणार नाही... आणि बंद हि करावे लागणार नाहीत...

म्हणूनच वाटत बंदच बंद करा !!!!!!

चाळीशीच्या उंबरठ्यावर...

चाळीशीच्या उंबरठ्यावर...

आज १३ जुलै माझा वाढदिवस..

सातारा जिल्ह्यातील कवठे गावात जन्म झाला परंतु पूर्ण आयुष्य या पुण्यनगरी मध्ये गेले असल्या मुळे थोडी चौकस बुद्धी आहे असं वाटत... त्याच दृष्टिकोनातून मागील ४० वर्षात आलेल्या काही चांगल्या, वाईट आठवणींची उजळणी करण्याचा आजचा दिवस...

अर्थात या दिवशी माझ्या आई अण्णांना विसरून कस चालेल...

"यशाच्या आकाशात गरुड होऊन जेव्हा भरारी मारत असशील तेव्हा पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील त्या माझ्या गरुडास..".

अभिनव मध्ये असतानां शाळेत कलर ड्रेस घालून मित्रांना रावळगाव चॉकलेट देण्याची मजा काही औरच... पण तेच सगळे चॉकलेट मित्र आज जेव्हा फोन करून शुभेच्छा देतात तेव्हा ती मैत्री नेहमीच आपुलकीची होते..
बघता बघता शाळा संपून कॉलेजच्या कट्टया वर साजरे केलेले वाढदिवस,लो बजेट मधल्या पार्ट्या ( आता लगेच पार्टी मागू नका...) या सारख्या आठवणी नेहमीच तजेला देतात..

सर्व वाय. एम. आणि मॉडर्न कट्टा मित्र मंडळी पुन्हा एकदा धन्यवाद...

मूळचा पिंड माणसं जोडण्याचा असल्या मुळे प्रोफेशनल वाटचालीत अनेक मित्र भेटले आणि त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या... पुढेही अशीच सोबत राहो...

लास्ट बट नॉट द लिस्ट माझी गोड फॅमिली मनिषा तन्मय आणि वेदांत... ज्यांनी माझ्या आयुष्याच्या चढ उतारात तब्बल एक तप माझी साथ दिली...

चाळीशीच्या उंबरठ्या वर मागे वळून पाहताना नक्कीच आनंद होतोय...मस्त चाललंय आमचं...


सर्वांच्या शुभेच्छा अशाच राहो दे...

सर्वांचे आभार...

टीप - (सदर लेख २०१८ मधील आहे) 

कोथरुड ते शिवणे व्हाया गादिया इस्टेट..

कोथरूड ते शिवणे व्हाया नंदनवन  सोसायटी.. (गादिया इस्टेट )

कोथरूड एक सुंदर आणि सुसंस्कृत  मराठमोळं ठिकाण.शालेय दिवसांपासून अगदी पूर्वीच्या बालगटापासून ते वयाची जवळपास चाळीशी गाठेपर्यंत अनेक चांगल्या वाईट आठवणींचा ठेवा घेत नवीन आयुष्याची वाटचाल शिवणेकडे करत आहे.

अभिनव शाळेतील माझे जुने
बालमित्र  उमेश जावळकर, सचिन  नाणेकर, शिवाजी उभे
महाराज,संभाजी चौधरी,हितेश जैन,अभ्या घुमरे, टम्म्या  आणि इतर  सगळे अजूनही  तेच जुने मैत्रीचे बंध जपणारे माझे मित्र नेहमीच सोबत होते आणि असतील.जावळकरांच्या अंगणात प्लास्टिक बॉल, प्लायवुड ने खेळलेली क्रिकेट असेल किंवा जीत ग्राउंडवर खेळलेल्या विशाल भेलके,नवनाथ टीम बरोबरच्या म्याचेस आणि गादिया टीमने हरलेल्या कटू आठवणी, वाय.म.कॉलेजचे ते मजेदार दिवस आणि हेवनचा चहा... त्याची  मजा काही औरच.

१९९३ जेव्हा नंदनवन सोसायटी (मूळची गादिया इस्टेट)मध्ये शिफ्ट झाल्यावर भेटलेले नवे मित्र निलेश थरकुडे, सचिन आढाव, योगेश दळवी(बाळा), राहुल कुंभार, प्रशांत आवटे (बंटी), गणेश कोळसे (गण्या), सचिन नेवसे आणि इतर सर्वजण कायम स्मरणात राहतील.गार्डन कोर्ट ग्रॉऊंड वर सौदामिनी,आर. म.टीम ला सतत हरवणे आणि परत हरवण्यासाठी निमंत्रण देणं.अभिजित शिंदे आणि सचिन
 बोराडे, विनायक कडूच्या संयुक्त भुसारी आणि भारतीनगर मित्रांशी होणाऱ्या लुटुपुटुच्या स्पर्धा,निवास, वर्पे बंधू,विनायक येनपुरे,विशाल आणि मित्राबरोबरच रात्री व्हॉलीबॉल खेळणं आणि त्यातून जोडली गेलेली मैत्रीची नाती नेहमीच मनाला ताजतवानं करतात.

संजू पवार, बंटी ,बाळा,निलेश आणि गादिया मधल्या मित्रांचा सिंहगड ट्रेक असेल किंवा दिवाळीच्या धुक्यात केलेली प्रामाणिक क्रिकेट प्रॅक्टिस,१९९९ च्या वर्ल्ड कप नंतर केलेल्या चर्चा,अनंता लोणकरांची वेगवान डावखुरी गोलंदाजी, सचिन  आढाव यांचा थरकुडेनी घेतलेला इंटरव्हिव,नेवसे काका,भालेकर काकूंची,आमले आजींची नेहमी असणारी आपुलकीची चौकशी,यातून आयुष्यात अनेक अडचणीना समोरजाण्याचं बळ दिलं हे मात्र नक्कीच.आई वडिलांच्या निधनानंतर केलेल्या अनेक तडजोडी आणि सर्वांची मिळालेली साथ अशीच पुढंही राहो.

मनिषा बरोबर विवाहबद्ध झाल्यानंतरआलेल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या सांभाळताना आलेल्या आठवणी हि याच कोथरूडच्याच ....

दुर्गा (मंगेशची कॉफी )असेल कि राजपूतचा सामोसा, हर्षदची अस्सल  मराठी पदार्थांची मेजवानी, हित्याच्या ४९/९९ मधल्या चहाच्या मेहफिलची  सर  येणार नाही.. व्यावसायिक वाटचालीमध्ये २००८ मध्ये कोथरूड ची नाळ तुटली आणि नशिबाने पुन्हा जुळाली.

आयुष्यातील एक सुखद टप्पा जवळपास ३८ वर्ष याच नंदनवनात गेला.अनेक आठवणी मनात साठवून आणि जोपासत  कोथरूडचा मुक्काम शिवणेला हलवत आहे...

या निमित्ताने  काही  जुन्या  आठवणींना उजाळा..आणि माझ्या सर्व मित्रांनाशुभेच्छा...

वर्क लाईफ बॅलन्स काळाची गरज ?

जागतिक महासत्ता बनण्यासाठी जर चीनशी स्पर्धा करायची असेल तर कॉस्ट आणि क्वालिटी यावर करावी लागेल. आपली मानसिकता थोडी बदलावी लागेल. ते कितपत शक...